अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यात भीमा नदीला आलेल्या महापूरामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे.या पार्श्वभूमीवर त्यांना दिलासा मिळावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे पूरग्रस्तांना मदत करण्यात आली आहे.हिळळी (ता.अक्कलकोट)
पाण्यात घरे गेलेल्या बाधीत पुरग्रस्त गरजु लोकांना प्रत्येकी चारशे रुपयेचे किराणा मालाचे
किट देण्यात आले.त्याशिवाय काल रामपूर, बोरी उंमरगे,संगोळगी, सांगवी ,मिरजगी या सहा गावात पुरबाधितांना एकूण २५० किट जिल्हा जनकल्याण कार्यवाह
महेश पाथरुडकर व संघ जिल्हा कार्यवाह संतोष कुलकर्णी, श्रीनिवास नलला यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात आले.यावेळी रमेश कापसे,चंदू जकापुरे,गुंडू येळमेली, संतोष वगाले, प्रसाद हारकुड,चेतन जाधव, परमेश्वर यादवाड ,इचगे,सुशील हिरासकर, कटकधोंड आदी उपस्थित होते.