अॅडिलेड : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडिलेड ओव्हल येथे पहिला कसोटी सामना खेळण्यात येत आहे. या पहिल्या कसोटी सामन्यातील आजचा (18 डिसेंबर) दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या अखेरच्या चार फलंदाजांना फक्त ११ धावा करता आल्या. भारताचा पहिल्या डाव २४४ धावांवर संपुष्ठात आला.
भारताने पहिल्या दिवशी ६ बाद २३३ धावा केल्या होत्या. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ७४ धावा केल्या होत्या. तर चेतेश्वर पुजाराने 43 तर अजिंक्य रहाणने 42 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.