ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भिमा नदीला आलेल्या महापूर व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबीयांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देऊ : खा. डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी

 

सोलापूर ,दि.२ :  भिमा नदी काठच्या कारकल,औज, मंद्रुप, कुरघोट, टाकळी,चिंचपूर गावात जाऊन पूरग्रस्त आणि अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबाना भेटुन विचारपूस केली.यावेळी त्यांनी भिमा नदीकाटच्या शेतीचे व घरांचे नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबीयांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी त्यांच्यासोबत जेष्ठ नेते हणमंत कुलकर्णी,तालुका सरचिटणीस यतीन शहा,रेल्वे सल्लागार समिती सदस्य महादेव कोगनुरे,गौरीशंकर मेंडगुदले,विश्वनाथ हिरेमठ,संदिप टेळे,बनसिध्द वडरे,संगप्पा केरके,सुरेश बगले,रायप्पा बन्ने,याच्यासह सर्व गालातील तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक उपस्थित होते.यावेळेस खा.जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांनी अधिकारी वर्गाना शेती पंचनामे तात्काळ करण्यासंदर्भात सूचना केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!