दिल्ली,दि.२६ : केंद्र सरकारने प्रत्येक घरापर्यंत वीज पोचवण्यासाठी सहज बिजली हर घर योजना सुरु केली असून या योजनेला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. केंद्र सरकारची अतिशय महत्त्वकांक्षी ही योजना असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 मध्ये या योजनेला सुरुवात केली होती.
आत्तापर्यंत दोन कोटीपेक्षा जास्त घरांना या योजनेमार्फत वीजपुरवठा करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.