ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हन्नुर येथे कृषी बिलाविरोधात टायर जळून निषेध

हन्नुर  (प्रतिनिधी):  दिल्ली मध्ये गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी बंधु – भगिनी शांतीपूर्ण पद्धतीने केंद्र सरकारच्या विरोधात मोदी सरकारला जागे करण्यासाठी जन आंदोलन करीत आहेत.देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजा सुखावला पाहिजे ह्या अनुषंगाने महाविकास आघाडी सरकारने ह्या आंदोलनास जाहीर पाठींबा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर हन्नुर येथे अनेक जड वाहने थांबवून टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी केंद्र सरकार विरुद्ध घोषणा देण्यात आल्या.

यावेळी राजकुमार भरमशेट्टी, धर्मणा हताळे,बाबुराव भरमशेट्टी, राजू सुतार,प्रशांत भरमशेट्टी, विशाल बिराजदार, योगीराज भरमशेट्टी नागनाथ पाटील, महादेव बंधीछोडो, संतोष शेखे,स्वामींनाथ रोट्टे, उत्तम भिसे, नान्हेगाव व हन्नुर परिसरातील शेतकऱ्यांनी जय जवान जय किसान जय हिंद नारा देत आंदोलनाला प्रतिसाद दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!