ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हातकणंगले तालुक्यातील पाडळी ग्रा.पं.वर जनसुराज्य पक्षाची बाजी

कोल्हापूर : राज्यातल्या 12,711 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्यावर आज मतमोजणी होणार आहे. आज एकूण २ लाख १४ हजार उमेदवारांचं भवितव्य निश्चित होईल.  सगळ्यांचंच या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायतीवर जनसुराज्य पक्षाने बाजी मारली असून गोराई ग्राम विकास आघाडीच्या 11 जागा निवडून आल्या आहेत. यामुळे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला असून हातकणंगले तालुक्यातील पहिल्या ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!