ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हिमाचलमधील भीषण दुर्घटनेत १० मृत्यू, अजूनही ढिगाऱ्याखाली २५ ते ३० जण अडकल्याची शक्यता

किंनौर : हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातल्या रेकांग पियो-शिमला या राष्ट्रीय महार्मागावर भुस्कलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे.

स्थानिक प्रशासन, पोलिस आणि एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे. आयटीबीपीकडूनही बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत महामार्गावरून जात असलेली एक प्रवासी बस ढिगाऱ्याखाली अडकली आहे. एक बस, एक ट्रक, बोलेरो आणि ३ टॅक्सी ढिगाऱ्याखाली सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!