ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विज बिलांवरुन भाजप आक्रमकः विधान भवनाच्या पायर्‍यांवर ठिय्या

मुंबईः राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे दिवस आहे. आज विजबीलावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. विज बिलावरुन भाजपने राज्य सरकारला चांगलेच लक्ष केले आहे. विज बिल भरले जात नसल्याने पुरवठा खंडीत केले जात आहे. याच्या निषेधार्थ भाजपच्या आमदारांनी आज मंगळवारी विधान भवनासमोर पायर्‍यांवर बसून आंदोलन केले. पायर्‍यांवर ठिय्या मांडून सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान वीज बिलांच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा होत नाही तोवर राज्यातील शेतकरी व घरगुती वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई होणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

आज अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!