मुंबईः राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ९वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच उत्तीर्ण करण्यात येणार आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शिक्षण विभागाने हा मोठा निर्णय घेतलं आहे.
यापूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलं आहे. १०वी आणि १२वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. या परीक्षांच्या वेळापत्रकात थोडासा बदल करायचा की नाही, याबाबत येत्या एक – दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याच शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.