ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खासदार राजीव सातव यांना श्रद्धांजली

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनावर शोक व्यक्त केली आहे. राजकारणातील संयमी, उमद्या नेतृत्वाचे अकाली जाणे क्लेशदायक असल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे.

राजीव सातव यांनी आपल्या प्रांजळ स्वभावाने पक्ष, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मित्र जोडले होते. संसदीय प्रणालीवर दृढ विश्वास असणारे आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांचा उल्लेख केला जात असे. त्यांचे अकाली जाणे हे त्यांच्या कुटुंबावर, पक्षावर मोठा आघात आहे, तो सहन करण्याची शक्ती सातव कुटुंबियांना मिळो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!