ध्यास विश्वसार्ह बातमीचा

इंग्लंड पहिल्या इनिंगमध्ये २०५ धावांवर गारद, अक्षर पटेलने ४ तर आर अश्विनने टिपले ३ विकेट

अहमदाबाद : भारत आणि इंग्लंडदरम्यान चौथा आणि अखेरचा कसोटी सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळविले जात आहे. इंग्लंडने गेल्या कसोटीप्रमाणे चौथ्या कसोटीतही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडची पहिली विकेट डॉमिनिक सिब्लेच्या रुपात पडली. तो संघाच्या १० धावा झाल्या असताना बाद झाला. पहिल्या इनिंगमध्ये २०५ धावा केल्या. ४ टेस्टच्या सीरीजमध्ये भारत २ सामने जिंकुन आघाडीवर आहे.

आज इंग्लंडकडून बेन स्टोक्सने ५५ धाव, डॅन लॉरेंसने ४६, ओली पोपने २९ आणि जॉनी बेयरने २८ धावा केले. तर, टीम इंडियाच्या अक्षर पटेलने ४ आणि रविचंद्रन अश्विनने ३ विकेट घेतल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!