मुंबई, दि.२५ : राज्यात सध्या अनेक ठिकाणी महापुराने जनतेला हैराण केले आहे त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त भागातील JEE विद्यार्थ्यांना पुन्हा परिक्षा देण्याची संधी मिळणार आहे.
कोल्हापूर ,पालघर ,रत्नागिरी ,रायगड,सिंधुदुर्ग ,सांगली ,सातारा भागात जे विद्यार्थी परिक्षा केंद्रावर पोहोचू शकत नाहीत त्यांना दुस-यांदा संधी मिळणार आहे.२५ आणि २७ तारखेला परिक्षा होणार होत्या JEE च्या परीक्षा. या निर्णयामुळे पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.