ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोनामुळे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

 

मुंबई, दि.१२ : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आले आहेत.याबाबतची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इयत्ता दहावीची परीक्षा जून मध्ये तर बारावीची परीक्षा मे अखेर होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षा होणार की नाही याबाबत चर्चा होत होती.आता या बातमीने या चर्चेला पूर्णविराम मिळाला
आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!