मुंबई, दि.१० : राज्यात रेमडेसिव्हीर या औषधाची प्रचंड टंचाई असून त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे,याकडे तातडीने मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे,
अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.यावर त्यांनी स्वतंत्र पत्र लिहून त्यांना माहिती दिली आहे.कोरोना उपचारात रेमडिसिव्हीर हे एक महत्त्वाचे औषध असून ते गरीब रुग्णांना त्वरित मिळणे गरजेचे आहे आणि हे औषध खासगी आणि सरकारी या दोन्ही रुग्णालयात मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती देखील त्यांनी
या पत्रात केली आहे.