ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकऱ्यांच्या विधेयकाबाबत विरोधी पक्षांकडून अपप्रचार

 

दिल्ली,दि.२५ : शेतकऱ्यांच्या विधेयकाबाबत विरोधीपक्ष खोटा प्रचार करून लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

ते आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांनाही संबोधित केलं. शेतकरी आणि कामगारांसाठी संसदेने मंजूर केलेली विधेयक ही त्यांना कायद्याच्या जंजाळातून मुक्त करणारी आहेत, असे देखील त्यांनी म्हटले आहे.विरोधी पक्षाने नेहमी खोटी आश्वासने देऊन कामगारांनी शेतकऱ्यांचा छळ करून त्यांचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला आहे असे देखील ते यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!