ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हजारो विद्यार्थी उतरले रस्त्यावर : वाहतूक केली ठप्प

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक विद्यार्थी आज देखील नोकरीपासून वंचित आहेत. त्यात्त २०२३ ची तलाठी भरती परीक्षा रद्द करून ती ४५ दिवसांच्या‎आत एमपीएससीमार्फत घ्यावी. या मागणीसाठी मंगळवारी‎ दि.१६ जानेवारी रोजी स्पर्धा परीक्षेची करणाऱ्या जिल्ह्यातील‎ विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.‎ स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली‎ मंगळवारी सकाळी ११ वाजता दोन हजार विद्यार्थी‎ बीडमध्ये एकवटले होते. शहरातील छत्रपती शिवाजी‎महाराज पुतळा येथून मोर्चाला सुरूवात झाली. नगर‎रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला.‎

या‎मोर्चासाठी केवळ दोनशे विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची‎ पोलिसांनी परवानगी दिली असताना प्रत्यक्षात मोर्चात‎तब्बल दोन हजार विद्यार्थी सहभागी होऊन त्यांनी‎ जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी‎ कार्यालयाच्या बाहेर येण्याच्या मागणी लावून धरली. ‎त्यातच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर कट्ट्यावर झाडे‎तोडण्यात आल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागाच‎ नसल्याने शेवटी विद्यार्थ्यांनी नगर रोडवर अर्धा तास ठिय्या‎ केल्याने वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी मोर्चेकरी‎विद्यार्थ्यांना रस्त्यावरून उठण्याचे सांगूनही विद्यार्थी न‎उठल्याने शेवटी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी गुन्हा‎नोंदवण्याचे आदेश दिल्यानंतर शिवाजीनगर ठाण्यात चार ‎‎आयाेजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात विद्यार्थ्यांसह १०० विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. ‎‎तलाठी भरती रद्द झालीच पाहिजे, परीक्षा फीस परत‎मिळालीच पाहिजे, प्रत्येक वर्षी पोलिस भरती झालीच‎पाहिजे, टीसीएसकडून परीक्षा घेणे बंद करा,‎एमपीएससीमार्फत परीक्षा घ्याव्यात अशा घोषणा‎विद्यार्थ्यांनी दिल्या. या मोर्चात विद्यार्थी नेते धनंजय गुंदेकर, ‎‎राहुल कवठेकर, राहुल कांबळे आदींचा सहभाग होता. ‎‎निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना निवेदन ‎‎देण्यात आले.‎

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!