मुंबई : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक राज्यातील उत्पादक भागात कमी उत्पादन झाल्यामुळे सध्या सुरू असलेल्या हंगामात कापसाचे उत्पादन सुमारे आठ टक्क्यांनी घसरून २९४.१० लाख गठडी होण्याचा अंदाज इंडियन कॉटन असोसिएशनने व्यक्त केला आहे. मंगल वर्षाच्या हंगामात (ऑक्टोबर-सप्टेंबर) एकूण कापूस उत्पादन ३१८. ९० लाख गाठी (१७० किलो) झाले होते.
देशाच्या उत्तरेकडील भागात ‘पिंक बॉल वर्म’ या किडीच्या प्रादुभार्वामुळे यावर्षी उत्पादन २४.८ लाख गाठींनी घटून २९४.१० लाख गाठींवर येण्याचा अंदाज आहे. त्याच बरोबर १ ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत जवळपास १५ ते ४५ दिवस पाऊस न पडल्याने दक्षिण आणि मध्य भागातील उत्पन्नावरही परिणाम होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले. या वर्षी नोव्हेंबरअखेर एकूण कापूस पुरवठा ९२.०५ लाख गाठी होण्याचा अंदाज आहे.
यामध्ये ६०.१५ लाख गाठींची आवक, तीन लाख गाठींची आयात आणि सत्राच्या सुरुवातीला २८.९० लाख गाठींचा प्रारंभिक साठा समाविष्ट आहे. इंडियन कॉटन असोसिएशनने नोव्हेंबर अखेर कापसाचा वापर ५३ लाख गाठींचा अंदाज वर्तवला आहे, तर ३० नोव्हेंबरपर्यंत ३ लाख गाठी कापूस निर्यात होण्याचा अंदाज वर्तवला आहे. नोव्हेंबर अखेर कापसाचा साठा ३६.०५ लाख गाठी असण्याचा अंदाज आहे. त्यापैकी २७ लाख गाठी कापड गिरण्यांकडे आहेत आणि उर्वरित ९.०५ लाख गाठी सीसीआय, महाराष्ट्र फेडरेशन आणि अन्य जणांचा समावेश आहे. कापूस ज्याची विक्री झाली पण वितरण होऊ शकले नाही, अशा कापसाचा यामध्ये समावेश आहे.