ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी : मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली घोषणा !

मुंबई : वृत्तसंस्था

येत्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची कोकणकरांना मोठी ओढ असते. आपल्या लाडक्या बाप्पााच्या स्वागतासाठी प्रत्येक चाकरमानी हा कोकणात गावी जात असतो. आता कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ पूर्णपणे सज्ज झाले आहे.

यंदाच्या गणेशोत्सवासाठी तब्बल 5000 जादा गाड्या सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या काळात या बसेस धावणार आहेत. 22 जुलैपासून गट आरक्षणाला सुरुवात होणार आहे.  ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के तिकिट दरात सवलत मिळणार आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जाणार आहे, याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली.

यावर्षी सुमारे ५००० जादा बसेस कोकणातील रस्त्यांवर धावणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी या बसेसचे आरक्षण एसटीच्या अधिकृत संकेतस्थळ npublic.msrtcors.com वर उपलब्ध करून देण्यात येत आहे. याशिवाय, बसस्थानकांवरून किंवा MSRTC Bus Reservation ॲपव्दारे देखील आरक्षण करता येईल, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

येत्या २३ ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून जादा बसेस कोकणासाठी सुटतील. गेल्या वर्षी ४३०० बसेस सोडण्यात आल्या होत्या, त्या तुलनेत यंदा ७०० बसेसची वाढ करण्यात आली आहे. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!