ध्यास विश्वसार्ह बातमीचा

यंदा बारावीचे सर्व विद्यार्थी पास शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : राज्य सरकारकडून बारावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतल्याचं जिर काढण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भातील शासन आदेश ट्विटरवर शेयर केला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेच्या विचार करता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून आयोजित करण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा रद्द करण्यात येत आहे.

बारावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट सर्व विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय स्थरावर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात यावे, असे या जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!