ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जरांगे पाटलांचे ठरलं : मुलाखती झाल्या, आता ‘या’ तारखेला घेणार निर्णय !

जालना : वृत्तसंस्था

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून दुसरीकडे राज्यातील अंतरवाली सराटी येथे विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची बैठक झाली. यावेळी केवळ मते आजमावून पाहण्यात आली. आजच्या बैठकीत निवडणुकीसंदर्भात काहीही ठरलेले नाही. शेवटी निर्णय २० तारखेला मराठा समाजासमोर होणार आहे. इच्छुकांची भूमिकाही महत्त्वाची असल्याने यावर चर्चा झाली, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी दि. १७ पत्रकार परिषेदत सांगितले.

जरांगे म्हणाले की, इच्छुकांची होत असलेली गर्दी हा आक्रोश आहे, ही आक्रोशाची लाट आहे. ही लाटच विजयाकडे नेणार आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आता मराठा समाजाशी चर्चा करूनच निवडणुकीबाबत निर्णय घेऊ. मराठा आरक्षण मागतो म्हणून आम्ही जातीयवादी नसून आम्ही सगळ्या जातीचेच काम करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करत आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भेटीवर जरांगे म्हणाले की, आता चर्चा करून काय उपयोग. ज्यावेळी निर्णय घ्यायचा होता. त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला नाही. दरम्यान, निवडणूक लढविण्यासाठी बहुतांश इच्छुकांनी तयारी दर्शवली. तर काहींनी निवडणूक लढविण्याबाबत नकारात्मका दर्शवली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!