ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नाशिकमध्ये होणार मराठी साहित्य संमेलन स्थगित

औरंगाबाद : नाशिकमध्ये होणारे ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला असल्याचे साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले.

तसेच कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर संमेलन घेण्याचा निर्णय घेऊ असेही कौतिकराव ठाले पाटील म्हणाले. साहित्य परिषदेच्या बैठकित हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कौतिकराव ठाले पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!