ध्यास विश्वसार्ह बातमीचा

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा गुरुपौर्णिमा उत्सव भक्तीभावात,हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद

अक्कलकोट :अवधूत चिंतन श्रीगुरुदेव,
सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की… जय! श्री अन्नपूर्णा देवी, श्री लक्ष्मी नारायण नामाच्या जयघोषात, संपूर्ण देशात अन्न हे पूर्णब्रह्माची साक्ष देणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या धर्मादाय न्यास संस्थेचा श्री गुरुपौर्णिमा व ३५ वा वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमाने बुधवारी संपन्न झाला.

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या असीमकृपेने अन्नछत्र मंडळ ३५ व्या वर्षात यशस्वी पदार्पण करुन नेत्रदीपक वाटचाल करीत आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी विविध कार्यक्रमाचे संयोजन केलेले होते.

दरम्यान गुरूपौर्णिमे निमित्त या कार्यक्रमात सकाळी ७ ते ९ श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण, सकाळी ९ ते १० नामस्मरण, जप व श्री गुरूपूजा, सकाळी १० वाजता महानवैद्य आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, अधिकराव रामाराव खुडे –पाटील (पालखी संयोजक कराड), गोरख दिवेकर (देणगीदार पुणे) यांच्या हस्ते दाखविण्यात आले व मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.

या विविध कार्यक्रमास पुष्पमाला ठाकूर, कु.आकांक्षा ठाकूर, कु.शितल म्हेत्रे, आरती लिंगायत, अभिनेत्री मृणाली कुलकर्णी, प्रतीक्षा जाधव, राधिका यतनुरकर, माथाडी नेते शिवाजीराव पाटील ठाणे, आबा बालगुडे, संदीप फुगे-पाटील, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, भाऊ कापसे, विश्वस्त राजेंद्र लिंबीतोटे, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, लाला राठोड, व्यंकटेश पटवारी, बिदरचे डॉ.सोमशेखर भालके, डॉ.सुमन भालके, ओंकार भिमपुरे, प्रा.शरणप्पा अचलेर, अभियंता किरण पाटील, अमित थोरात, श्रीकांत झिपरे, राजेश गायकवाड, रोहित खोबरे, प्रविण देशमुख, वैभव मोरे, सौरभ मोरे, संजय गोंडाळ, राजाभाऊ नवले, निखिल पाटील, प्रवीण घाडगे, सनी सोनटक्के, पिंटू दोडमनी, महेश मुळे, गोटू माने, विश्वनाथ हडलगी, रामचंद्र समाणे, किरण जाधव, प्रदीप पाटील, राजकुमार झिंगाडे, धनंजय गाढवे, रोहन शिर्के, योगेश पवार, अप्पा हंचाटे, मैनुद्दीन कोरबु, सरफराज शेख, दत्ता माने, मुन्ना कोल्हे, बाळू पोळ, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, शहाजीबापू यादव, कल्याण देशमुख, चंद्रकांत हिबारे, धानप्पा उमदी, सिध्दाराम कल्याणी, एस.के.स्वामी, राजेंद्र पवार, बाळासाहेब घाडगे, कैलास माडकर, सिद्धेश्वर हत्तुरे, दादा साळुंखे, धर्मराज गुंजले, अशोकराव जाधव, स्वामिनाथ बाबर, मेजर जाधव, योगेश पवार, सागर शिंदे, रोहन शिर्के, केदार तोडकर, विशाल कलबुर्गी, अमोल पोतदार, गोविंदराव शिंदे, वैभव नवगिरे, पिंटू साठे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, राहुल इंडे, सुमित कल्याणी, महेश दणके, टिनू पाटील, फहीम पिरजादे, कुणाल भालेकर आदीजण उपस्थितीत होते.

गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात असलेले यात्रीनिवास गेल्या दोन दिवसापासून हाऊसफुल्ल झालेले होते. मंडळाने पार्किंगची व्यवस्था चोख केलेली होती. राज्यासह परराज्यातील लाखो भाविकांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात महाप्रसादाकरिता गर्दी झालेली होती.

गेल्या १० ते १२ दिवसापासून श्री गुरु पौर्णिमा व ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, किर्तन या कार्यक्रमासह गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी महाप्रसाद भक्तांना वाटप होण्याकरिता पावसात देखील नेटके नियोजन केलेले होते.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे राज्यातील एकमेव असे महाप्रसादालय आहे की, यथाशक्ती देणगीतून गेल्या ३५ वर्षापासून अविरत सुरु आहे. भक्तांना देणगीबाबत कोणतेही बंधन नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्मांची साथ देणारे मंडळ आहे. या महाप्रसादाने आत्मा तृप्त होतो व मोठ समाधान मिळते. मंडळाच्या वर्धापन दिनास शुभेच्छा व उत्तरोत्तर मंडळाचे प्रगती व्हावे ही श्रीचरणी प्रार्थना अशा शुभेच्छा आमदार सचिन कल्याणशेट्टी दिले.

विधिवत पूजा न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पु पुजारी, विश्वसंभर पुजारी व संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी, यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचलन व आभार श्वेता हुल्ले यांनी मानले.

रक्तदानाला
प्रतिसाद

गेल्या १० ते १२ दिवसापासून श्री गुरु पौर्णिमा व ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर येथील विविध रक्तपेढीने अन्नछत्र मंडळात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये १ हजार स्वामी भक्तांनी रक्तदान केले.

पोलिसांचा
चोख बंदोबस्त

श्री गुरु पौर्णिमा व ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी चोख पोलीस बंदोबस्त मंदिर व न्यासाच्या परिसरात लावण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!