मुंबई : ओबीसींचे राजकीय आरक्षण तसेच मराठा आरक्षण, MPSC विद्यार्थ्याची आत्महत्या, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी विषयांमध्ये अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात घोषणाबाजी केली.







