ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कंत्राटी भरतीचे पाप महाविकास आघाडीचे : आमदार सचिन कल्याणशेट्टी

 

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केल्याचा आरोप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केला.

भाजपच्यावतीने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी ए-वन चौक, येथे माफीनामा आंदोलन पुकारण्यात आले. याप्रसंगी आमदार कल्याणशेट्टी बोलत होते.

पुढे बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, कंत्राटी भरतीचे महापाप करणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच मविआने महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी असे म्हणाले.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, सहर अध्यक्ष शिवशरण जोजण, महिला अध्यक्ष सुरेखा होळीकट्टी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवानंद पाटील, माजी नगरसेवक महेश हिंडोळे, रमेश कापसे, मिलन कल्याणशेट्टी, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष महिबूब मुल्ला, दुधनी बाजार समितीचे सभापती अप्पू परमशेट्टी, सरपंच चिदानंद उन्नद, अण्णाराव बाराचारी, परमेश्वर यादवाड, प्रदीप पाटील, अक्षय वाडकर, मधुकर चिवरे, अनिल पाटील, दयानंद बमनळ्ळी, सुनील दसले, राजू थंब, संजय बागनगरे, बाळा शिंदे, देविदास गवंडी, राहुल वाडे, दयानंद बिडवे, अतिष पवार, अंकुश चौगुले, सुदर्शन यादव, शंकरराव भांजे, नन्नु कोरबू, सिद्धेश्वर माळी, अण्णाराव बाराचारी, सागर तेली, बबलू कामनुरकर, सागर डिग्गे यांच्यासह सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, सर्व आघाडी अध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!