---Advertisement---

निवडणुकीच्या रणधुमाळीत चंद्रकांत पाटील यांचा विरोधकांना टोला; ‘पैसे आणि वेळ वाचवा’

By team
On: January 27, 2026 10:18 AM
Follow Us:
---Advertisement---

सांगली : वृत्तसंस्था

राज्यात जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय वाकयुद्ध अधिकच तीव्र झाले आहे. सांगली येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत बोलताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर थेट टीका करत, आगामी निवडणुकांत त्यांच्या पराभवाचे भाकीत केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ थेट तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचला आहे. लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सन्मान योजनांमुळे सामान्य जनता समाधानी असून, सरकारच्या कामावर विश्वास व्यक्त करत आहे. “जनतेचा हा पाठिंबा येणाऱ्या निवडणुकांच्या निकालातून स्पष्टपणे दिसून येईल,” असा दावा त्यांनी केला.

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांच्या निकालांचा संदर्भ देत त्यांनी विरोधकांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. “नगरपालिकेचे निकाल पाहिल्यानंतर विरोधकांची जमिनीवरील स्थिती स्पष्ट झाली असेल. अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस उद्या आहे. विरोधकांनी जर शहाणपण दाखवून उमेदवारी मागे घेतली, तर त्यांचे अनावश्यक खर्च होणारे पैसे आणि वेळ दोन्ही वाचतील,” असे वक्तव्य पाटील यांनी केले.

स्थानिक राजकारणातील गटबाजी व यंत्रणांवर भाष्य करताना ते म्हणाले की, “ग्रामीण भागातील राजकारण मला चांगले माहिती आहे. गट टिकवणे, यंत्रणा उभी करणे आणि आर्थिक ताकद वापरणे हे शब्द मी जवळून अनुभवले आहेत. विरोधक कितीही प्रयत्न केले, तरी जनतेचा कौल बदलू शकणार नाही. शेवटी विजय विकासाचाच होणार आहे.”

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, त्यांच्या या टीकेला विरोधकांकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!