मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्याची पुन्हा लॉकडाऊनकडे वाटचाल सुरु झाली आहे. काही जिल्ह्यात लॉकडाऊन लागले आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसने वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता दोन आठवड्यांसाठी पक्षाचा जनता दरबार दोन आठवड्यांसाठी स्थगित केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पनेतून पक्षाचे मंत्री दर आठवड्याला जनता दरबार घेतात, यात ते जनतेच्या प्रश्नांची निराकरण करतात.
जाहिरात