अक्कलकोट,दि.१९ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणातून मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास रब्बी पिकांसाठी व पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले.त्यामुळे अक्कलकोट,मैंदर्गी,दुधनीसह नदीकाठच्या गावचा आणि शेतीचा पाणी प्रश्न मिटला आहे.पंरंतु बोरी नदीकाठावरील बंधारे किरकोळ दुरुस्त करून पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता.परंतु तसे काही झाले नाही.यामुळे बणजगोळ सह काही बंधाऱ्यातून संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणा व हलगर्जीपणामुळे अजूनही मोठ्याप्रमाणात पाणी गळती होत आहे.अशीच गळती सुरु राहिल्यास बंधारा बघताबघता रिकामा पडू शकतो, म्हणून बणजगोळ बंधाऱ्याची गळती त्वरित थांबविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.चार दिवसापूर्वी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत अक्कलकोटमध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती.त्यावेळी बोरी नदीवरील बंधारे किरकोळ दुरुस्त करून पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता.त्यानुसार पाटबंधारे विभागाने कार्यवाही करत धरणाचे चार दरवाजे प्रत्येकी एक ते दीड इंच उचलून त्यातून सहाशे क्युसेक्स पाणी खाली सोडण्यात आले आहे.या सोडलेल्या पाण्यातून अक्कलकोट,सांगवी,ममदाबाद,
बणजगोळ, निमगाव,सातनदुधनी,
रुददेवाडी,बबलाद,सिंदखेड येथील आठ बंधारे भरून घेतली आहे.यामुळे तीन नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेसह नदीकाठावर अवलंबून असलेल्या गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे.तसेच अनेक ठिकाणी रब्बी पिके वाळून जात होते.तर काही गावांत पाणी टंचाई निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर त्यांना हे पाणी उपयुक्त ठरणार आहे.परंतू बणजगोळ बंधाऱ्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीच न झाल्याने प्लेट लिकेज् होऊन पाणी मोठ्याप्रमाणात खाली गळती होत आहे.तसेच बणजगोळ बंधार्यावर संरक्षक भिंतच नसल्याने बंधारे धोकादायक बनले आहेत.या बंधाऱ्यावरुन ऊसाचे ट्रक,ट्रॅक्टरचे वाहतूक होत असल्याने बंधार्याला संरक्षण भिंत नसल्याने मोठ्या प्रमाणात धोका वाढला आहे.तरी बंधाऱ्यातून होणारी गळती व व्यवस्थित रित्या संरक्षण भिंत बांधण्याची मागणी नदीकाठावरील बणजगोळ येथील ग्रामस्थामधून होत आहे.बंधाऱ्यातील पाणी किमान दोन महिने शेतकऱ्यांना पुरेल ,असा अंदाज अधिकारी वर्गातून सांगितले जात होते.परंतु वास्तविक पहाता बंधाऱ्यातून खाली मोठ्याप्रमाणात पाणी गळती होत असल्याने बंधारा लवकरच कोरडा पडू शकतो.म्हणून त्वरित बंधाऱ्याची दुरुस्ती करून बणजगोळ बंधाऱ्यावर संरक्षक भिंत बांधण्याची मागणी नदीकाठावरील बणजगोळ येथील शेतकरी गडेप्पा व्हसुरे, गंगाराम राघोजी, सुरेश तळवार,बाळू घाटगे, मल्लिनाथ राघोजी, शिवाजी धडके, गुडुसाब पठाण, महमद पठाण, शिवानंद राघोजी, रमेश मुळे यांच्या सह इतर ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.
बंधारे दुरुस्तीचा प्रस्ताव
कुरनूर धरणाखालील बोरी नदीकाठावरील बणजगोळ सह इतर बंधारे दुरुस्ती संदर्भात प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.प्रस्ताव मंजूर झाल्यास त्वरीत बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात येईल. तसेच बंधाऱ्यावरुन जडवाहनास वाहतूक करण्यास बंदी असतानाही काही शेतकरी व ग्रामस्थांनी बंधाऱ्यावरुन वाहतूक करत आहेत.
याकडे आम्ही देऊ.
प्रकाश बाबा, उपविभागीय अधिकारी,पाटबंधारे