मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. राज्याची लॉकडाउनकडे वाटचाल सुरू झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये संचार बंदी लागू झाली आहे. दरम्यान आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. ते काय मोठी घोषणा करणार याकडे लक्ष लागले होते.
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट असल्याचे बोलले जात आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली किंवा नाही हे येत्या १५ दिवसांत स्पष्ट होईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले. महाराष्ट्रात विदर्भातील विशेषत: अमरावतीची परिस्थिती चिंताजनक आहे असे त्यांनी सांगितले.