दिल्ली,दि.२९ : ‘खेलो इंडिया फिर से’ या उपक्रमांतर्गत देशात टप्प्याटप्प्याने क्रीडा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेऊन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पुढील ऑलिंपिक्स आणि आशियाई तसंच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा लक्षात घेऊन क्रीडा उपक्रम सुरू करण्यासंदर्भात देशाच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाकडून याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.