ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आ.रोहित पवारांची पोस्ट : थेट अजित पवारांवर साधला निशाणा !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणात हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठ वादंग उठले होते. त्यानंतर विरोधकांनी सरकारवर चांगलेच ताशेरे देखील ओढले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक आपल्या बरोबर नकोत असं पत्रही अजित पवारांना लिहिलं आहे. अधिवेशनात नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्याने शिंदे गटाचीही कोंडी झाली आहे. अशात आता रोहित पवार यांनी अजित पवार यांचं नाव न घेता ते स्वतःच्याच सहकाऱ्यांची बाजू घेताना कसे अडखळत आहेत हे म्हटलं आहे. रोहित पवारांची ही सूचक पोस्ट चर्चेत आहे.

प्रशासनावर पकड असलेले, कार्यक्षम, स्पष्टवक्ते, रोखठोक भूमिका घेणारे नेते म्हणून ओळख असलेले नेतृत्व आज स्वतःच्याच सहकाऱ्याची बाजू मांडताना अडखळत आहे, हे बघून अत्यंत वाईट वाटतं. भाजपला केवळ सांगकामे नेतृत्व आवडतं. स्वयंभू नेतृत्व त्यांना नको असतं म्हणूनच त्यांच्याकडून लोकनेते संपवले जातात. आता वैचारिक मतभेद असले तरी एक क्षमता असलेला लोकनेता भाजपच्या रणनीतीचा शिकार होत आहे, याचं दुःख सर्व सहकाऱ्यांसह सर्वसामान्यांनाही नक्कीच आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पहिल्याच दिवशी भारतीय जनता पार्टी व अजित पवार गट या दोन सत्ताधाऱ्यांमध्ये विसंवाद निर्माण झाल्याचं चित्र दिसून आलं. विशेष म्हणजे सभागृहात हे काहीही न घडता सभागृहाबाहेर हे सगळं घडून आलं. सकाळी सभागृहात एकत्र बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनी संध्याकाळी अजित पवारांना पत्र पाठवून नवाब मलिकांबाबत नाराजी व्यक्त केली आणि हे पत्र त्यांनी ट्विटरवरही पोस्ट केलं. त्यामुळे यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं असताना आता त्यावर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!