ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भरधाव कंटेनरची भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला जबर धडक : ८ जणांचा मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील अनेक राज्यात अपघाताच्या घटना घडत असतांना आता उत्तर प्रदेशातून एक भीषण अपघाताची घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एक रस्ते अपघात झाला आहे. येथे एका कंटेनरने भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला मागून धडक दिली. त्यामुळे ट्रॅक्टर उलटला. या अपघातात ८ भाविकांचा मृत्यू झाला. ४३ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ३ जणांची प्रकृती गंभीर आहे.

मृतांमध्ये ६ वर्षांचा एक मुलगा, ४ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग ३४ वरील अर्निया परिसरातील घाटाल गावाजवळ रविवारी रात्री २ वाजता हा अपघात झाला. भाविक कासगंजहून राजस्थानमधील गोगामेडी येथे जहारबीर (गोगाजी) दर्शनासाठी जात होते. कंटेनरचा चालक पळून गेला. कंटेनर भाताच्या भुश्शाने भरलेले होते.

माहिती मिळताच डीएम श्रुती आणि एसएसपी दिनेश कुमार सिंह घटनास्थळी पोहोचले. एसएसपींनी सांगितले की, १० जखमींना बुलंदशहर जिल्हा रुग्णालयात आणि २३ जणांना खुर्जा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १० जखमींना अलीगढ मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले आहे. महामार्गावरून ट्रॅक्टर हटवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

मृतांची ओळख पटली आहे. ईयू बाबू (४०), रामबेटी (६५), चांदनी (१२), घनीराम (४०), मोक्षी (४०), शिवांश (६), योगेश (५०), विनोद (४५) हे सर्वजण कासगंजचे रहिवासी आहेत. जखमी राजकुमार म्हणाले- आम्ही सोरोनहून गोगामेडीला जात होतो, तेव्हा मागून एका कारने ट्रॉलीला धडक दिली. आमची मुलेही आमच्यासोबत होती, त्यांनाही खूप दुखापत झाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!