मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे तर याच निवडणुकीतील जागावाटपाबाबत महाविकास आघाडी 18 ते 20 सप्टेंबर दरम्यान मुंबईत बैठक घेणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी (17 सप्टेंबर) ही माहिती दिली. या बैठकीत मविआमधील प्रत्येक पक्षाला किती जागा आणि कोठे मिळतील याचे सूत्र ठरवले जाईल, असे राऊत म्हणाले.
जागावाटपाचा निर्णय उमेदवारांच्या विजयाच्या शक्यतेवर आधारित असेल. मविआमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत 13 जागा जिंकल्यानंतर काँग्रेसचे मनोबल वाढले आहे. या कारणास्तव पक्ष अधिक जागांची मागणी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसला महाराष्ट्रातील एकूण 288 विधानसभा जागांपैकी 110-120 जागांवर विधानसभा निवडणूक लढवायची आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची (भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी) दुसरी फेरी 31 ऑगस्ट रोजी पार पडली. राष्ट्रवादीच्या सूत्रांनी एएनआयला सांगितले की, 3 तास चाललेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील 288 पैकी 173 जागांवर सहमती झाली आहे.
भाजपला जास्तीत जास्त जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीला जागा मिळतील. मात्र, कोणत्या पक्षाला किती जागा देण्याचे मान्य झाले, याची माहिती समोर आलेली नाही. या नंतरच्या बैठकीत उर्वरित 115 जागांवर निर्णय होणार आहे. जागावाटप निश्चित करण्यासाठी आणखी 2-3 बैठकांच्या फेऱ्या होतील.