ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मंत्री शिरसाटांनी ‎घेतली जरांगेंची भेट‎ : मोठ्या विषयावर झाली चर्चा !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतांना या सभागृहात अनेक विषयांवर गंभीर चर्चा झाली यात औरंगजेबाची कबर उखडली ‎पाहिजे यावर देखील आरोप प्रत्यारोप झाले यात आता पालकमंत्री संजय शिरसाट यांनी‎ मनोज जरांगे यांची शनिवारी भेट ‎घेतली. शिरसाट यांनी जरांगे यांच्या‎ तब्येतीची विचारपूस केली. या वेळी‎ शिरसाट म्हणाले की, विद्यार्थ्यांचे‎ काही प्रश्न असून त्यावर चर्चा ‎झाली. शिंदे समितीचे काम सुरू‎ नसल्याचे जरांगे यांनी लक्षात आणून‎ दिले. तीन गॅझेटबाबत नोटिफिकेशन‎ काढले नाही, असे त्यांनी सांगितले‎ आहे. याबाबत सोमवारी मुंबईत‎ गेल्यावर बैठक बोलावता येते का‎ पाहतो. या बैठकीत हे मुद्दे मांडू.‎तसेच आमची भूमिका‎ औरंगजेबाची कबर उखडली ‎पाहिजे. अबू आझमीकडे घेऊन‎जाऊ. आझमीचे निलंबन रद्द होणार‎ नाही. पद निलंबित कसे होईल हे‎ आम्ही पाहू, असे शिरसाट म्हणाले.‎

वक्त बोर्डाला पैसे पुरवतात.‎कबरीला पैसे पुरवतात. इथे जमते. ‎‎केवळ आमच्या-आमच्यात भांडण ‎‎‎लावून देतात. ४० ‎‎‎वर्षे कुठे गेले‎‎होते? मनपा ‎‎‎निवडणूक‎‎तोंडावर ठेवून ‎‎‎औरंगजेबाची‎कबर काढायची अन् बोलायचे‎सुचते. औरंगजेबाने तिकडून येऊन ‎‎इथल्या मुसलमानांना डाग लावला. ‎‎आम्हाला माहिती आहे, औरंगजेब ‎‎किती नालायक होता. आम्हाला‎माहिती आहे, कबर केव्हा‎काढायची. आमचे मावळे आहेत,‎असे म्हणत मराठा नेते मनोज जरांगे ‎‎यांनी राज्य सरकारला टोला‎लगावला आहे.‎

मराठा नेते मनोज जरांगे पाटील ‎‎खासगी रुग्णालयात उपचार घेत ‎‎आहेत. या वेळी जरांगे यांनी‎शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.‎जरांगे यांना औरंगजेबाची कबर‎काढण्यावरून सुरू असलेल्या‎वादावर विचारले. या वेळी जरांगे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎म्हणाले, ४० वर्षे कुठे गेले होते?‎आता तोंडावर महानगरपालिकेच्या‎निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे‎विषय काढला जात आहे, असे‎म्हणत राज्य सरकारला खडसावले.‎

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!