ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धक्कादायक : तलावात बुडून ४ शाळकरी मुलाचा दुर्देवी मृत्यू !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

राज्यातील छत्रपती संभाजी नगरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळूज परिसरातील रांजणगावच्या दत्तनगरातील ४ शाळकरी मुलांचा गुरुवारी बनकरवाडी तलावात बुडून मृत्यू झाला. विश्वजितकुमार सुखदेव उपाध्याय (१२), अफरोज जावेद शेख (१४), अबरार जावेद शेख (१२) व कुणाल अनिल दळवी (१२) अशी मृत मुलांची नावे आहेत. दोन भावंडांपैकी अफरोज मदरशात तर अबरार साईराम इंग्रजी शाळेत शिकत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व मुले एकाच भागात राहत असल्याने मित्र होती. गुरुवारी सायंकाळी खेळण्याच्या नादात ते घरातून बाहेर पडले. मात्र, उशिरापर्यंत परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. बराच वेळानंतर जवळच असलेल्या बनकरवाडी तलावाच्या काठावर या मुलांचे कपडे दिसले. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसीचे पीआय अविनाश आघाव यांनी अग्निशमन विभागाला कळवले. पथकाने बुडालेल्या मुलांना बाहेर काढून घाटीत दाखल केले, पण डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!