मानाच्या पालख्यांचे वाखरीत आगमन, प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्वागत

पंढरपूर, दि.19: आषाढी एकादशीसाठी आज मानाच्या पालख्यांचे वाखरी येथे आगमन झाले. मानाच्या पालख्यांचे स्वागत जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तर विठ्ठल-रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार, कोरोनाच्या नियमांचे पालन करत आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मानाच्या पालख्यांचे आगमन वाखरी पालखी तळावर झाले. … Read more

‘ग्यानबा तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमले कौंडण्यपूर, महामारी टळो ; सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभो ; पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी घातले विठ्ठलाला साकडे

अमरावती, दि. १८ : शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना व गोरगरीब जनतेला सुखी ठेव, कोरोना महामारीचे संकट नष्ट होऊ दे, सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभू दे, चांगला पाऊस येऊन सगळीकडे शेते पिकू दे, महाराष्ट्र भूमीत समृद्धी निर्माण होऊ दे…असे साकडे महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज श्री विठ्ठलाला घातले. आषाढी वारीसाठी कौंडण्यपूरहून पंढरपूरला मानाची … Read more

Don`t copy text!