ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तलावात ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली : २४ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील उत्तर प्रदेश राज्यातील कासगंज येथे दि.२४ रोजी शनिवारी एक मोठी भीषण घटना घडली. येथील तलावात ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रॉलीमध्ये 54 लोक होते. सध्या घटनास्थळी बुलडोझरच्या सहाय्याने बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो. हे सर्व लोक एटा येथील जैथरा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. वेगामुळे हा अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला जाऊन तलावात पडला. हे लोक माघी पौर्णिमेला कासगंजमधील कादरगंज घाटावर ट्रॅक्टर-ट्रॉलीतून गंगेत स्नान करण्यासाठी जात असताना रियावगंज पटियाली मार्गावरील गधई गावाजवळ हा अपघात झाला. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ट्रॅक्टर भरधाव वेगाने जात होता. नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्ता सोडून तलावात पडला.

माघी पौर्णिमेला ट्रॅक्टर ट्रॉलीतून कासगंज येथील कादरगंज घाट येथे गंगेत स्नान करण्यासाठी सर्व लोक जात असताना रियावगंज पटियाली मार्गावरील गधई गावाजवळ अपघात झाला. ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तेथे पोहोचले. काही वेळातच मोठ्या संख्येने लोक जमा झाले. डीएमनी सांगितले की, अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 7 निष्पाप मुले आणि 8 महिलांचा समावेश आहे.
घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थांनी सांगितले – आम्ही तलावाजवळ उभे होतो, तेव्हा अचानक एक ट्रॅक्टर-ट्रॉली भरधाव वेगाने येताना दिसली. ट्रॅक्टर-ट्रॉली नियंत्रणाबाहेर जाऊन तलावात गेली. त्यामुळे ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या बाजूला उभे असलेले लोक बिथरून पाण्यात पडले. तर ट्रॅक्टर-ट्रॉलीत बसलेले लोक पाण्याखाली गेले. अनेकजण ट्रॅक्टर-ट्रॉलीखाली गाडले गेले.

आरडाओरडा ऐकून आम्ही घटनास्थळी धावलो. इतर ग्रामस्थांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. जे काही दिसले ते आम्ही बाहेर काढले. जास्तीत जास्त लोकांनी पाण्यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. कुणीतरी पोलिसांना कळवले. यानंतर रुग्णवाहिका आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. बेशुद्ध झालेल्यांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!