अहमदनगर : वृत्तसंस्था
बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात आणि महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ रविवारी अहमदनगरमध्ये सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार नितेश राणे यांनी पुन्हा थेट हिंदूंना एकत्र राहण्याचे आवाहन केले.
दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्यापैकी राणे कुटुंबीय आहे आणि मी हिंदूचा गब्बर आहे, असे विधान नितेश राणेंनी केले. रिमझिम पावसातच नगरमध्ये सकल हिंदू मोर्चा निघाला होता. पोलिसांनी यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. संवेदनशील ठिकाणी बॅरिकेट आणि काही ठिकाणी थेट लोखंडी पत्रे ठोकून रस्ते बंद करण्यात आले होते. दिल्लीगेट येथे मोर्चाची सांगता झाली.
आमदार राणे म्हणाले,‘महंत रामगिरी महाराज यांनी सिन्नरमधील प्रवचनात जो मुद्दा मांडला, त्यांनी तो पुन्हा पुन्हा मांडत राहावा. संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे. कोणी मस्ती केली तर चून-चून के मारेंगे. मी 63 एन्काऊंटरचा आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या मुलगा आहे असा इशारा नितेश राणेंनी दिला. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडवट हिंदू आहेत. तर देवेंद्र फडणवीसांचे हिंदुत्व शंभर टक्के आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर त्यांना सोडणार नाही. आमचे अब्बा तुमच्या अब्बांच्या पाकिस्तानात नाही तर हिंदुस्तानात बोलले आहेत. यावेळी नितेश राणे यांनी मंहत रामगिरी महाराज यांच्या विधानाच्या समर्थनाथ पाठिंबा दर्शवला. पुढे राणे म्हणाले, एवढ्या संख्येने बाहेर येऊ की किड्या-मकोड्यासारखे मारु. हा हिंदुंचा देश येथे फक्त भगवंतांचे चालेल बाकी कोणाचे नाही. कोणीही मस्ती केली तर चून-चून के मारेंगे, असेही राणे म्हणाले.
यावेळी राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाप्रकरणी आंदोलन करणाऱ्या महाविकास आघाडीवरही टीका केली. राणे म्हणाले, ‘शिल्पकार जयदीप आपटेंनी चूक केली, हे आम्हा सर्वांना मान्य आहे. त्यांना कोणीही वाचविणार नाही. त्यांना अटक केली जाईलच. माझ्यासमोर आल्यावर मी तर उचलून आपटल्याशिवाय राहणार नाही. मात्र, याप्रकरणी महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी आहे. चीनी मॉडेलसारखे त्यांचे शिवप्रेम आहे. जेव्हा पुण्यात हडपसरमध्ये पठाण नावाच्या आरोपीने शिवरायांच्या पुतळ्याच्या बिटंबना केली, तेव्हा विरोधकांनी जोडो मारो आंदोलन केले नाही. खरा शिवप्रेमी जात-पात बघत नाही,’ असेही राणे म्हणाले.