जालना : वृत्तसंस्था
गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवालीत पाच वेळा उपोषण केले असून आता मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी, १७ सप्टेंबरपासून ते आंतरवाली येथे सहाव्यांदा उपोषणाला बसणार आहेत. १६ सप्टेंबरला मध्यरात्री १२ वाजता त्यांचे उपोषण सुरु होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु मीसुध्दा मराठ्यांसाठी झुंज देण्याचा निर्धार केला अाहे. आता आपली शहीद होण्याचीही तयारी आहे, असे म्हणत सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. २९ सप्टेंबरऐवजी ते १२ दिवस आधीच उपोषण सुरु करणार आहेत.
जरांगे पाटील यांनी २९ सप्टेंबरपासूनउपोषणाला बसण्याची घोषणा केली होती, पणमंगळवारी त्यांनी आंतरवाली सराटी येथेपत्रकार परिषद घेऊन आता २९ ऐवजी १७सप्टेंबरपासूनच उपोषणाला बसणार असल्याचेसांगितले. फडणवीस मराठ्यांना संपवण्यासाठीझुंजत आहेत. महाराष्ट्रातील सर्वच मराठाआमदारांना आमच्याविरोधात करत आहेत.सगेसोयरे अंमलबजावणी कधी करणार?हैदराबाद, गॅझेट केव्हा लागू करणार? गुन्हे कधीमागे घेणार? असे प्रश्न त्यांनी विचारले.
गेल्या चार दिवसांत कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि अल्पसंख्याकविकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी आंतरवालीत येऊन, जरांगेपाटलांची भेट घेतली होती. दोन्ही भेटी रात्री उशिरा झाल्या होत्या.मंत्री सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन आपल्याला पुन्हा संपर्ककरतो असे जरांगे यांना सांगितले होते. त्यानुसार सत्तार यांनी दोनदिवसांपूर्वी जरांगे यांना फोनही केला. त्यानंतर जरांगे यांनी उपोषणाचेहत्यार उपसले आहे. त्यामुळे दोन्ही मंत्र्यांच्या भेटीनंतरही जरांगे यांचेसमाधान झाले नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जरांगे पाटीलयांनी जाहीर केलेल्या तारखेपुर्वीच उपोषणाचा निर्णय घेतला आहे.आता सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.