---Advertisement---

मोठी बातमी : एक आठवड्यापूर्वीच अमरनाथ यात्रा थांबवली !

By team
On: August 2, 2025 5:24 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील अमरनाथ यात्रा ही ९ ऑगस्टपर्यंत चालणार होती, परंतु मुसळधार पावसामुळे यात्रा मार्गांची गंभीर दुरवस्था झाल्याने ती ३ ऑगस्ट रोजीच थांबवण्यात आली आहे. काश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांच्या मते, बालटाल आणि पहलगाम या दोन प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दुरुस्तीचे काम सुरू आहे. सतत मशीन आणि कर्मचारी तैनात असूनही यात्रा पुन्हा सुरू करणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

अमरनाथ यात्रा ३ जुलै रोजी सुरू झाली होती आणि या यंदाच्या यात्रेत आतापर्यंत सुमारे ४.१० लाख भाविकांनी अमरनाथाच्या गुप्त गुहेला भेट दिली आहे. गेल्या वर्षी भाविकांची संख्या ५.१० लाखांहून अधिक होती.

यात्रेदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने सुमारे ५०,००० सीआरपीएफ जवान तैनात केले गेले होते. मात्र, ५ जुलै रोजी रामबन जिल्ह्यातील चंदरकोट लंगरजवळ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ताफ्याच्या चार बसेसची अपघात झाला. बस चालकाच्या ब्रेक फेल झाल्यामुळे चार बसेस एकमेकांना धडकल्या आणि ३६ प्रवासी जखमी झाले.

पावसामुळे झालेल्या या अडचणींमुळे आणि अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षिततेचा विचार करून यात्रा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यात्रा मार्गांवर होणाऱ्या दुरुस्तीच्या कामांनंतरच ती पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!