नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बिहार निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केला आहे. आज पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी निवडणुकांबद्दल प्रश्न उपस्थित करत भाजपवर मत चोरीचा आरोप केला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत,”पूर्वी इलेक्ट्रॉनिक मशीन्स नव्हत्या, तरीही संपूर्ण देशात निवडणुका एकाच दिवसात होत असत, परंतु आता असे होत नाही” असे म्हटले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी,”लोकशाहीत प्रत्येक पक्षाला विरोधाला सामोरे जावे लागते, परंतु भाजपला त्याचा परिणाम का होत नाही हे मला माहित नाही आणि तो एकमेव असा पक्ष आहे.” असे म्हणत पक्षाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. पुढे ते म्हणाले, “पूर्वी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे नव्हती, तरीही संपूर्ण देश एकाच दिवशी मतदान करत असे. आता मतदान खूप महिने चालते. वेगवेगळ्या दिवशी मतदान का केले जाते?”अससी सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
निवडणूक आयोगावरही प्रश्न उपस्थित करत राहुल म्हणाले, “एक्झिट पोल, ओपिनियन पोल काहीतरी वेगळेच दाखवतात, जसे हरियाणा आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकीत दिसून आले आणि नंतर अचानक निकाल काहीतरी वेगळेच येतो. यामध्ये मोठा फरक दिसून आला आहे.” आमचा सर्व्हेही खूप चांगला आहे, पण त्याचा निकालही वेगळा दिसतो. सर्व्हेत जे काही दिसते ते निकाल त्याच्या उलट येतो.” असे सांगत त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.
राहुल गांधी यांनी यावेळी पुढे बोलताना, “महाराष्ट्रात ५ महिन्यांत खूप नवीन निवडणुका झाल्या आहेत, गेल्या ५ वर्षांपेक्षा हे खूप जास्त आहे. त्यामुळे आम्हाला संशय आला. आमच्या युतीने विधानसभा निवडणुकीत पराभव केला, पण आम्ही लोकसभा निवडणुकीत विजयी झालो. महाराष्ट्र निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आम्हाला संशय आहे. अचानक एक कोटी नवीन मतदार कुठून आले? आम्ही निवडणूक आयोगाकडे मतदार यादी मागितली, पण त्यांनी मतदार यादी दिली नाही.”
ते म्हणाले की,”देशात बनावट मतदान होत आहे. ही चोरी पकडण्यासाठी आम्हाला बराच वेळ लागला. आम्ही आमच्या पातळीवर चौकशी केली, ज्यासाठी आम्हाला सहा महिने लागले. आम्ही बेंगळुरू मध्यवर्ती लोकसभा मतदार संघातील महादेवपूरची चौकशी सुरू केली. आम्ही महादेवपूरची जागा ३२७०७ मतांनी गमावली. भाजपने ही जागा एक लाखाहून अधिक फरकाने जिंकली. यामुळे आम्हाला शंका आली की काहीतरी गोंधळ आहे.”
याविषयी बोलताना त्यांनी ,”आमच्या चौकशीत मतदार यादीत अनेक अनियमितता उघडकीस आल्या. या मतदार यादीत अनेक लोकांच्या वडिलांच्या नावासमोर काहीही लिहिले गेले आहे. मतदार यादीतील ४० हजार घरांचे पत्ते शून्य आहेत. डुप्लिकेट मतदारांची संख्या खूप जास्त आहे. तीन वेळा मतदान करणारे ११ हजार संशयास्पद लोक आहेत. हे लोक कुठून येत आहेत? एकाच पत्त्यावर ४६ मतदार आहेत. ही निवडणूक आयोग आणि भाजपची एका खोलीच्या घरात संगनमत आहे.