ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्वातंत्र्यदिनी मांस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय : खा.ओवैसी आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था

एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने आणि मांस दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केली.  तसेच महापालिका अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला असंवेदनशील आणि असंवैधानिक म्हटले आहे. हैदराबादचे  खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी अनेक महानगरपालिकांनी सोशल मीडियावर दिलेल्या  आदेशांवर टीका केली. त्यांनी मांस खाणे आणि स्वातंत्र्यदिन यांच्यातील संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ओवैसी यांनी आपल्या पोस्ट केले की, “असे दिसते की भारतातील अनेक महानगरपालिकांनी १५ ऑगस्ट रोजी कत्तलखाने आणि मांस दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दुर्दैवाने जीएचएमसीनेही असाच आदेश दिला आहे. हे असंवेदनशील आणि असंवैधानिक आहे.”  ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष यांनी, “मांस खाणे आणि स्वातंत्र्यदिन साजरा करणे यात काय संबंध आहे? तेलंगणातील ९९ टक्के लोक मांस खातात.” “हे मांस निर्बंध लोकांच्या स्वातंत्र्य, गोपनीयता, उपजीविका, संस्कृती, पोषण आणि धर्माच्या अधिकारांचे उल्लंघन करतात.”असे म्हटले.

स्वातंत्र्य दिन आणि जन्माष्टमीनिमित्त मांस दुकाने बंद ठेवण्याचे आदेश GHMC ने आधीच जारी केले आहेत. महानगरपालिकेने GHMC कायदा, १९५५ च्या कलम ५३३ (B) अंतर्गत हा आदेश जारी केला आहे. GHMC आयुक्तांनी हैदराबाद, सायबराबाद आणि राचकोंडाच्या पोलिस आयुक्तांना हा आदेश पाठवला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!