ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रोहित पवार सुरू करणार ‘जनता दरबार’; अजित पवारांचा लोकसंपर्काचा वारसा कायम

मुंबई : वृत्तसंस्था

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाची शैली जपण्याचा निर्णय आमदार रोहित पवार यांनी घेतला आहे. विधानसभेत भावनिक क्षण अनुभवलेल्या रोहित पवार आता दर मंगळवारी ‘जनता दरबार’ आयोजित करून जनसामान्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. या उपक्रमाद्वारे ते सर्वसामान्यांबरोबरच पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या अडचणीही थेट समजून घेणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे अधिकृत पत्रकानुसार, आमदार रोहित पवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत मुंबईतील प्रदेश कार्यालयात आपला पहिला जनता दरबार आयोजित करणार आहेत. विधानसभेच्या अधिवेशनानंतर हा दरबार दर मंगळवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत नियमितपणे चालवला जाईल. पक्षाचे सूत्रे म्हणतात की, या उपक्रमातून लोकांच्या तक्रारींचे निवारण होणार आहे आणि पक्ष संघटना अधिक मजबूत होईल.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दर मंगळवारी जनता दरबार भरवण्याचा वारसा संपूर्ण महाराष्ट्राला परिचित होता. ते नियमबद्धपणे लोकसंपर्क करत सर्वसामान्यांचे प्रश्न तत्परतेने सोडवत असत. हा वारसा आता आमदार रोहित पवार पुढे नेणार आहेत.

दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी रोहित पवार विधिमंडळात भावुक झाले होते आणि त्यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. गेल्या काही दिवसांत त्यांनी चार पत्रकार परिषदांद्वारे या दुर्घटनेच्या तपासावर संशय व्यक्त केला असून, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी करत या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आग्रही मागणी केली आहे. यामुळे अपघाताचा प्रकरण आता राजकीय वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार रोहित पवारांचा ‘जनता दरबार’ उपक्रम आता बारामतीत अजित पवारांनी जपलेल्या लोकसंपर्काचा वारसा कायम ठेवण्याचे माध्यम ठरणार आहे, तसेच पक्ष व जनतेच्या संवादाला नवीन गती देणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!