मुंबई : राज्यात सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया सुरु होणार आहे. कोरोना पॉझिटिव्हीटी रेटनुसार पाच टप्प्यांमध्ये अनलॉक प्रक्रिया होणार आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्यात अनलॉक प्रक्रियेसाठी ५ टप्पे तयार करण्यात आले आहेत.
शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये राज्यातील पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात 5 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा समावेश आहे तर चौथ्या टप्प्यात फक्त 2 जिल्ह्यांचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढल्यास पाचव्या स्तरात संबंधित जिल्ह्याचा समावेश केला जाईल.
- तिसऱ्या टप्प्यात खालील सुरु होणारे जिल्हे
अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, या जिल्ह्यांचा समावेश आहे. - अशी असेल नियमावली
– अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद राहतील.
– मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील.
– हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत खुली रहातील. दुपारी 2 नंतर पार्सल सेवा. शनिवार आणि रविवार बंद राहतील.
– सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 यावेळेत सुरू राहतील.
– खासगी आणि सरकारी कार्यालयात 50 टक्के क्षमतेने उपस्थिती परवानगी असणार आहे.
– इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील.
– सिनेमा चित्रीकरणाला स्टुडीओमध्ये परवानगी देण्यात आली आहे.
– सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमाला 50 टक्के क्षमतेने दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी (सोमवार ते शुक्रवार)
-लग्न सोहळ्यास 50 जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार 20 जणांची उपस्थिती, इतर बैठकीस 50 टक्के उपस्थित रहाण्यास परवानगी देण्यात आली आहे.
– कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
– दुपारी 2 वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहिल.