मुंबई: राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज बुधवारी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. वीर सावरकर यांच्या नावाने भाजप राजकारण करत आहे, मात्र वीर सावरकर यांना भारतरत्न देत नाही. सावरकरांना भारतरत्न न देणाऱ्या भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. दरम्यान यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. वीर सावरकर यांना देशद्रोही, समलैंगिक म्हणणाऱ्या कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून शिवसेना बसली आहे. सावरकरांचा सन्मान न करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
Breaking
- अवकाळी गारपीट आणि वादळी पावसाने राज्यातील शेतकरी चिंतेत !
- गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री फडणवीस यांचा महत्वाचा संकल्प !
- ‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणी राज्य सरकारने मोठा निर्णय
- बारामती पोटनिवडणुकीत संभ्रम; ‘पवार गट लढला नाही तर आम्ही मैदानात’ ; काँग्रेसचा इशारा !
- महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची चर्चा का? ठाकरेंना पुन्हा धक्का देणार शिंदे?
- गुढीपाडव्याचा जल्लोष राज्यभर; शोभायात्रा, ढोल-ताशा आणि भगव्या रंगात महाराष्ट्र रंगला !
---Advertisement---






