सोलापूर वृत्तसंस्था
राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढली आहे. मुंबईसह राज्यभरातील शहरांचा किमान तापमानाचा पारा दिवसागणिक खाली येत आहे. त्यातच अजून आता थंडीची लाट येणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
पुणे येथील हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन तीन दिवस राज्यात गारठा कायम राहणार आहे. यास बोचरी थंडी म्हणता येणार नाही, मात्र यंदा असे वातावरण लवकर तयार झाले असून, पहाटे बाहेर काम करणाऱ्या नागरिकांनी सुरक्षात्मक खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच पुढील दोन दिवस मुंबईच्या किमान तापमानाचा हा ट्रेंड कायम राहील, असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुंबईकरांना गुलाबी थंडीचा आनंद घेता येणार आहे. तर थंडीपासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कुठे किती आहे थंडी
अहिल्यानगर : ९.४
नाशिक : १०.६
परभणी : ११.६
जळगाव : ११.७
नागपूर : ११.७
महाबळेश्वर : ११.८
गोंदिया: ११.९
सातारा : १२
छत्रपती संभाजीनगर : १२.२
नंदुरबार : १२.८
मालेगाव: १२.८
वर्धा : १३.५
बुलढाणा : १३.६
अकोला : १३.६
चंद्रपूर : १३.८
धाराशिव : १४
अमरावती : १४.१
सांगली : १४.४
सोलापूर : १५.२
कोल्हापूर : १५.५
अलिबाग : १५.८
मुंबई : १७.६
रत्नागिरी : २०.५
पालघर : २२.४