अक्कलकोट : प्रतिनिधी
श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात नित्यनेमाने हजारो भाविकांना महाप्रसाद दिला जातो. जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या जरी गॅस टाक्यांची टंचाई झाली असली तरी अ़न्नछत्र मंडळाचे महाप्रसाद कायॅ सुरळीत असल्याची माहिती सचिव श्यामराव मोरे यांनी सांगितले.
अन्नछत्र मंडळामध्ये दररोज चपाती, भाजी, भात, आमटी, एक गोड पदार्थ असलेला महाप्रसाद 20 ते 25 हजार भाविकांना दिला जातो. मंडळात ठरलेल्या वेळेनुसार महाप्रसादाचे वाटप मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सुरू आहे, असल्याचे शामराव मोरे यांनी सांगितले.