नवी दिल्ली | कृषी कायद्यांवरून सदस्यांचा संसदेत गोंधळ सुरू असतानाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प (Budget 2021)मांडायला सुरुवात केली. कोरोनाव्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था गडगडलेली असताना हा अर्थसंकल्प सादर होत आहे.
दरम्यान, यावेळी त्यांनी महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली आहे. नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.