दिल्ली,दि.८ : प्रसिद्धी माध्यमांच्या बातम्यांवर
आमचा विश्वास असून त्यांनी सवंग लोकप्रियतेच्या बातम्या देणे त्यांनी टाळावे,विश्वासार्ह बातम्यांकडे अधिक लक्ष द्यावे,असे मत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे.
माणिकचंद्र वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी सांगता समारंभात ते बोलत होते.यावेळी त्यांनी माणिकचंद्र वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रसिद्धीमाध्यमांना स्वातंत्र्य नक्कीच आहे,याचा अर्थ काहीही बातम्या देणे असं नाही, प्रसिद्धीमाध्यमांनी स्वतःच्या कार्यपद्धतीत सुधारणा करायला हवी, असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.