ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भारत आणि जपानच्या सायबर सुरक्षेच्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

 

दिल्ली,दि.८ : शेजारील देशांचे संबंध वाढवण्याच्या दृष्टीने भारताने आणखीन एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

ते म्हणजे भारत आणि जपान या दोन राष्ट्रादरम्यान सायबर सुरक्षा विषयक सहकार्य करार करण्यात आला आहे.याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.या पार्श्वभूमीवर भारत आणि कॅनडा यांच्यामध्ये जिनोम बारकोडींग करारही होणार आहे. नव्या तंत्रज्ञानात सहकार्य, सायबर स्पेसची क्षमता वाढवणे, गुंतागुंतीच्या सुविधांना सुरक्षा देणे, सुरक्षाविषयक धोके ओळखणे यासंबंधीची माहिती या करारातून मिळणार आहे. आणि ही माहिती देण्यासाठी दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करणार आहेत. त्याशिवाय आरोग्याला घातक अशा
सात विविध रसायनावर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!