---Advertisement---

संरक्षण मंत्र्यांनी पाकिस्तानला दिला पुन्हा इशारा !

By team
On: October 2, 2025 3:45 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्लील : वृत्तसंस्था

आज विजयादशमीच्या निमित्ताने देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला. त्यांनी, ऑपरेशन सिंदूर दरम्यान, पाकिस्तानने भारताच्या संरक्षण यंत्रणेत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता आणि आपल्या सैन्याने त्याला चोख प्रत्युत्तर दिले होते. ” असे म्हटले. संरक्षण मंत्र्यांनी यावेळी सांगितले की, “जर पाकिस्तानने सर क्रीक परिसरात काहीही करण्याचे धाडस केले तर यापुढे त्याचा भूगोल बदलला जाईल” असे म्हणत थेट इशाराच दिला आहे.

विजयादशमीच्या निमित्ताने, संरक्षण मंत्र्यांनी गुजरातमधील कच्छ याठिकाणी एका शस्त्र पूजन समारंभात भाग घेतला. त्यानंतर त्यांनी भारतीय सैनिकांना संबोधित करताना, “ऑपरेशन सिंदूर दरम्यान, पाकिस्तानने लेहपासून सर क्रीकच्या या भागात भारताच्या संरक्षण यंत्रणेत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. तथापि, प्रत्युत्तरात्मक कारवाईत, भारतीय सैन्याने पाकिस्तानी हवाई संरक्षण यंत्रणेचा पूर्णपणे पर्दाफाश केला आणि जगाला संदेश दिला की भारतीय सैन्य कधीही, कुठेही आणि कसेही पाकिस्तानचे मोठे नुकसान करू शकते.”असे म्हटले.

पुढे ते म्हणाले, “स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही, सर क्रीक परिसरात सीमा वाद उपस्थित होत आहे. भारताने वारंवार संवादाद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु पाकिस्तानचे हेतू सदोष आहेत आणि त्याचे हेतू अस्पष्ट आहेत.” सर क्रीकला लागून असलेल्या भागात पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांचा अलिकडच्या विस्तारावरून त्याचे हेतू उघड होतात. राजनाथ सिंह म्हणाले, “भारतीय सैन्य आणि सीमा सुरक्षा दल भारताच्या सीमांचे सतर्कतेने रक्षण करत आहेत. सर क्रीक परिसरात पाकिस्तानने केलेल्या कोणत्याही आक्रमणाला जबरदस्त प्रत्युत्तर दिले जाईल जे इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलेल. पाकिस्तानने हे लक्षात ठेवले पाहिजे की कराचीचा एक मार्ग खाडीतून जातो.”

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!